रामायण व महाभारत खरंच घडले आहे की फक्त कथा आहेत?
रामायण व महाभारत खरंच घडले आहे की फक्त कथा आहेत? राऊत , इतिहासप्रेमी, जागतिक इतिहास अभ्यासण्यात विशेष अभिरुची 2019 M11 22 अपडेट केले मी फक्त महाभारताबद्दल लिहणार आहे आणि ते घडले होते हे सिद्ध करणारे काही पुरावे देणार आहे. महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढले गेले हे सगळ्यांनाच माहित असेल. हे स्थान सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये आहे. हस्तिनापुरच्या सिंहासनासाठी हे युद्ध लढले गेले होते. हस्तिनापूर सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. १९५२ साली पुरातत्व विभागाने ह्या ठिकाणी केलेल्या उत्खननात विदुराचे महल, द्रौपदीचे स्वयंपाकघर, तांब्याची भांडी, लोखंडी वस्तू, सोन्याचांदीचे दागदागिने, जुगारासाठी वापरण्यात आलेल्या कवड्या अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू आढळून आल्या. हस्तिनापुरमध्ये करण्यात आलेल्या उत्खननात असे आढळून आले की ह्या ठिकाणी लोखंडी वस्तू बनविण्याची मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती. तसेच १३५ वेगवेगळ्या लोखंडी वस्तू आढळून आल्या ज्यामध्ये तुटलेले बाण, सुऱ्या, कुऱ्हाडी, इ. चा समावेश होता. तसेच ह्या भागात शेती आणि पाळीव जनावरे ह्यावर चालणारी एक मोठी अर्थव्यवस्था अ...