"शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात."

महाराष्ट्रात एक म्हण आहे 100 वर्षांपासून , "शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात."

365 किल्ल्यांची एक ढाल बनवून काही हजारांची फौज घेऊन तीनही शाह्याना (मुघल,आदिल, कुतुब),सिद्दी, इंग्रज,पोर्तुगिज ,डच,फ्रेंच याना अवघ्या 25 वर्षात उरावर घेऊन त्याना पळो की सळो सोडले ते आपल्या सारख्या स्वाभिमानी आणि प्रगतशील समाजाची निर्माण करावी म्हणून…….

आपल्या चारित्र्यावर एकही डाग न घेणाऱ्या शिवाजी महाराजानाकाय माहीत ,आपण ज्या समाजासाठी झगडतोय तो पुढे जाऊन भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत जगात पहिला असेल…अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल ही त्यांची चूकच….

कल्याणच्या सुभेदाराची सुनेला लुगडी चोळी घेऊन मुलीप्रमाणे रवानगी करणाऱ्या ,शत्रूच्या स्त्रियांना हात काय नजर सुद्धा उचलायची नाही अशी ताकीद देणाऱ्या , तसेच बलात्कारी रांझे पाटील चे दोन हात दोन पाय तोडणार्या महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी ते झगडले आहेत तो जगात बलात्काराच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवेल,"निर्भया " सारखे गुन्हे करतील…असा खोटा आशावाद त्यांनी बाळगला असेल ही त्यांची चूकच….

400 जहाजे निर्माण करून सिंधुदुर्ग, विजय दुर्ग, सुवर्ण दुर्ग बनवून दूरदृष्टी ठेवून उच्च दर्जाचे आणि पश्चिमी ताकदीच्या हृदयात धडकी भरवणा-या आरमाराची रचना करणाऱ्या शिवाजी महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी आपण झगडतोय त्यातील सैनिक एका चिलखतासाठी आणि चांगल्या शस्त्रास्त्रांसाठी तडफेल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल ही त्यांची चूकच….

सर्वात उत्कृष्ट हेरखाते निर्माण करून सर्व शत्रूंना अतिशय कमी रसदेत मात देणाऱ्या शिवाजी महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी आपण झगडतोय त्यात हेर खातेच नको म्हणणारे पंतप्रधान होतील, मुंबईतून सरळ आत येऊन शिरून शेकडो लोकांची हत्या करेल.कारगिलमधून आत येऊन 10 किलोमीटर बंकर बनवतील पण आमच्या हेर खात्याला कल्पनाच नाही…असे वाटणाऱ्या शिवाजी महाराजांची चूकच….असा खोटा आशावाद त्यांनी बाळगला असेल ही त्यांची चूकच….

असा प्रश्न आपण विचारात आहे ही आपली चूक नाही तर खरोखर महाराजांना पण कल्पना नसेल ज्या समाजासाठी त्यांनी स्वतः आणि आपले कुटुंब खर्ची घातले, त्यांना आजकाल फक्त चौथीच्या इयत्ता मधेच काही धड्यात त्यांना स्थान दिलंय, शम्भू महाराजांना 1 धडा, राजाराम महाराज आणि ताराबाईला मिळून एक धडा , पहिला बाजीरावला दोन पाने अन् उरलेले पेशवे एक पानात संपवणार आहे …… ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या असहकार आणि अहिंसा शिकवण्यास तब्बल नऊ इयत्ता खर्ची पडल्या….मोठे झाल्यावर कळते की स्वातंत्र्य मिळाले ते दुसऱ्या महायुद्ध मुळे……अशा आंदोलनामुळे नाही.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांनी कोणत्या चुका केल्या आहेत का? असल्यास पुराव्यासह स्पष्ट कराल का?

संत अमाई माता